Latur

[atlasvoice]

महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील लातूर जिल्हा समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेला आहे. याचा उल्लेख राष्ट्रकूट राजवटीच्या काळापासून आढळतो. राजा अमोघवर्षाने या शहराचा विकास केला. ते “लत्तलूट” या नावाने ओळखले जात असे. हे राष्ट्रकुटांचे मूळ जन्मस्थान मानले जाते. बालाघाट पठारावर वसलेला हा जिल्हा मंजरा नदी आणि तिच्या तेरणा, तावरजा, आणि घारणी या उपनद्यांनी समृद्ध आहे. आज लातूर महाराष्ट्रातील १६ वे मोठे शहर असून जिल्ह्याचे प्रशासनिक मुख्यालय म्हणून कार्यरत आहे.

लातूरमध्ये हिंदू ,मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन समुदायांचा सुंदर सहवास आढळतो ज्यामुळे येथे विविध संस्कृतींचा मिलाफ पाहायला मिळतो. भजन, गोंधळ आणि अभंग ही येथील लोकसंगीताची खरी ओळख आहे. तसेच धनगरी गाजा, लावणी आणि पोवाडे यांसारख्या पारंपरिक नृत्यशैलींमधून लातूरची सांस्कृतिक संपन्नता दिसून येते. दरवर्षी श्री सिद्धेश्वर यात्रा आणि लातूर महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. जेथे स्थानिक कला,परंपरा आणि संस्कृती यांना नवसंजीवनी मिळते.

लातूरच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा आणि सांस्कृतिक विविधतेचा अनुभव घ्यायचा असेल तर हा जिल्हा नक्कीच एक अनोखी सफर ठरू शकतो!

लातूरचा समृद्ध इतिहास

लातूरचा इतिहास राष्ट्रकूट राजवटीपासून (इ.स. ७५३–९७३) सुरू होतो. सुरुवातीला “लत्तलूट” या नावाने ओळखले जाणारे हे शहर राष्ट्रकूट राजा दंतिदुर्गाचे जन्मस्थान असून पुढे राजा अमोघवर्षाने या शहराचा विकास केला. युगानुयुगे सातवाहन, चालुक्य, यादव, दिल्ली सल्तनत, बहमनी, आदिलशाही आणि मुघल साम्राज्य अश्या राजवटींच्या अधिपत्याखाली लातूर राहिले.

१७व्या शतकात लातूर हैदराबादच्या निजामांच्या राजवटीत सामील झाले. निजामशाहीच्या काळात कररचनेत सुधारणा करण्यात आल्या आणि शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कर प्रणाली हळूहळू कमी केली गेली. प्रशासनिक पुनर्रचनेनंतर लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले.

१६ ऑगस्ट १९८२ रोजी लातूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. यामध्ये १० तालुके आणि ९०० हून अधिक गावे समाविष्ट करण्यात आली त्यापैकी काही शेजारील जिल्ह्यांतून हस्तांतरित झाली.

लातूरमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत त्यापैकी पापविनाशक मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. येथे १२ व्या शतकातील सम्राट सोमेश्वर तृतीय यांचे कन्नड शिलालेखाचे अवशेष आजही पहायला मिळतात. आज लातूर मराठवाड्याच्या प्रशासन, उद्योग आणि संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. जिथे इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

लातूरमधील प्रमुख पर्यटनस्थळे

  • धार्मिक स्थळे
    १. श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर
    १२ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर भगवान सिद्धरामेश्वरांना समर्पित आहे. राजा ताम्रद्वज यांनी बांधलेल्या या मंदिरात कोरीव शिल्पकलेचे सुंदर नमुने पाहायला मिळतात. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते जी भक्तांसाठी मोठे आकर्षण ठरते.
    २. श्री अष्टविनायक मंदिर
    दाक्षिणात्य शैलीत बांधलेले हे भव्य मंदिर सुंदर बागांनी आणि कृत्रिम कारंज्यांनी सुशोभित केलेले आहे. येथे ९ फूट उंच शिवमूर्ती आणि अष्टविनायक गणेश मूर्ती आहेत ज्या श्रद्धा आणि ध्यानासाठी शांत वातावरण निर्माण करतात.
    ३. श्री विराट हनुमान मंदिर
    २५ फूट उंच भव्य हनुमान मूर्तीमुळे प्रसिद्ध असलेले हे मंदिर एक आकर्षक धार्मिक स्थळ आहे. या मंदिराच्या आवारात सुंदर बाग आणि अनोख्या धबधब्यासारख्या पाण्याच्या पडद्यामुळे त्याला एक वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
    ४. सूरत शहवली दर्गा
    १९३९ मध्ये बांधलेला हा दर्गा संत सैफुल्ला शहा सरदारी यांच्या समाधीचे स्थान आहे. येथे दरवर्षी पाच दिवसांचा उत्सव भरतो जो हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. विशेष म्हणजे हा दर्गा चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ आहे ज्यामुळे लातूरमधील धार्मिक विविधता अधोरेखित होते.
  • किल्ले
    १. उदगीर किल्ला
    १२ व्या शतकातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध उदगीर किल्ला उदगीर तहासाठी ओळखला जातो. येथे ऋषी उदयगिरी महाराजांची समाधी आहे. किल्ल्यात भुयारी मार्ग, फारशी भाषेतील शिलालेख आणि सैनिकी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे पाहायला मिळतात.
    २. औसा किल्ला
    डेक्कन सल्तनत काळात संरक्षणासाठी बांधलेला हा किल्ला एक नैसर्गिक उतारावर स्थित आहे. सैनिकी दृष्टिकोनातून उंच निरीक्षण कडा असल्यामुळे हा किल्ला शत्रूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त होता.
  • लेण्या
    १. खरोजा लेण्या
    ६ व्या शतकातील या लेण्या लातूरपासून ४५ कि.मी.अंतरावर आहेत. येथे कोरीव शिल्पांमध्ये जैन तीर्थंकर, बुद्ध मूर्ती, शिव-पार्वती आणि विष्णूच्या प्रतिमा आढळतात. “सीता न्हाणी” हा भाग रामायणकालीन संदर्भ देतो ज्यामुळे या लेण्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढते.
  • अन्य आकर्षणे
    १. गंज गोलाई मार्केट
    १९१७ मध्ये फैयाजुद्दीन यांनी बांधलेले हे भव्य बाजारपेठेचे केंद्र लातूरच्या हृदयस्थानी आहे. १५ रस्त्यांचा संगम असलेल्या या वर्तुळाकार बाजारात मध्यभागी दुमजली देवी जगदंबा मंदिर आहे. येथे सोन्या-चांदीचे दागिने, वस्त्रे आणि पादत्राणे यांसारख्या वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. ज्यामुळे हा बाजारप्रेमींसाठी एक स्वर्गच आहे.

इतिहास,संस्कृती आणि वास्तुकलेचा मिलाफ पाहायचा असेल तर लातूरला नक्कीच भेट द्यावी.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

लातूर जिल्ह्याला भेट देण्याचा योग्य काळ निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचा प्रवास आनंददायी आणि स्मरणीय ठरेल.

ऑक्टोबर ते मार्च हा काळ लातूर पाहण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. हवामान आल्हाददायक आणि थंड असते. थंड हवामानामुळे बाहेरील उपक्रम, वन्यजीव सफारी आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणे अधिक आरामदायक होते. कडक उन्हामुळे होणारा त्रास या काळात जाणवत नाही त्यामुळे संपूर्ण जिल्हा शांत आणि आनंददायी वाटतो.

कालावधी वैशिष्ट्ये
ऑक्टोबर ते मार्च आल्हाददायक आणि थंड हवामान, निसर्गसौंदर्य आपल्या तेजात, बाहेरील उपक्रमांसाठी उत्तम, वन्यजीव सफारी व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी अनुकूल, कडक उन्हाचा त्रास नाही

लातूरच्या निसर्गरम्य सौंदर्यात हरवून जाण्यासाठी आणि त्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा आस्वाद घेण्यासाठी हिवाळ्याचे महिने सर्वोत्तम आहेत!

लातूर जिल्ह्याला का भेट द्यावी?

लातूर हे इतिहास,संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा अद्वितीय संगम असलेले ठिकाण आहे. जे प्रत्येक प्रवासप्रेमीच्या यादीत असायला हवे.

लातूरचा वारसा राष्ट्रकूट राजवटीपासून सुरू होतो.त्याच्या समृद्ध इतिहासाचे दर्शन गंज गोलाई मार्केटसारख्या भव्य वास्तू आणि सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरासारख्या धार्मिक स्थळांमध्ये होते. उदगीर आणि औसा किल्ले इतिहासाची साक्ष देतात तर खरोजा लेण्या प्राचीन कला आणि पौराणिक वारसा जपताना दिसतात. लातूरमधील उत्सव आणि विविधतेने नटलेली पारंपरिक संस्कृती येथे येणाऱ्या पर्यटकांना वेगळाच आनंद देते.

येथील शांत,आल्हाददायक निसर्गसौंदर्य आणि समृद्ध इतिहास यांचा अनोखा संगम हा ऑक्टोबर ते मार्च दरम्यान अनुभवायला सर्वोत्तम असतो. इतिहास, संस्कृती, आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी लातूरला नक्की भेट द्या!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

27 - 38°C

Ideal Duration

1 - 2 days

Best Time

June to September

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Vrundavan Park Chakur

Chakur is situated on the state highway of Latur-Nanded, which is around 35 km from Latur city.

Udgir Fort

Udgir Fort in the Udgir city in Latur district, Maharashtra, India, was built in the pre- Bahamani age.

Ausa Fort

The fort featured prominently in the conflicts between the Deccan Sultanates in the post- Bahamani period.

Kharosa Caves

The Kharosa Caves are located close to a village with the same name, Kharosa, in the Latur district of Maharashtra.

Udgir Hattibet-Deverjan

In the Udgir taluka of Latur district, the Mauje Elephant Island is situated 16 km on the west side of Udgir city.

How to Reach

By Air

The nearest airports to reach this place are Pune (370 km), Hyderabad (298 km), and Aurangabad (264 km).

By Train

Latur district is connected by train. The available trains are from Mumbai (430 km), Pune (338 km), Nanded (186 km), and Hyderabad (243 km). The railway stations are Latur Railway Station, Latur Road Railway Station, and Harangul Railway Station, which come under Latur headquarters.

By Road

Regular State Transport buses are available from any Maharashtra State Road Transport Corporation Bus Stand. National Highway 62 passes through Ausa Taluka in Latur District.
Scroll to Top